२४ ऑगस्ट, २०२५

हडप्पा संस्कृती एक पुरातन सभ्यता...!

 




पुरातत्व खात्याने साधारण १०० वर्षापूर्वी पाकिस्तानातील पंजाब प्रांतात एक पुरातन शहराचा आणि त्या काळातील अतिशय आधुनिक समजल्या जाणाऱ्या संस्कृतीचा शोध लावला. हि संस्कृती अंदाजे ३३०० ते १७०० इसवी सन पूर्व या दरम्यान अस्तित्वात होती. पुरातन अशी असणारी हि संस्कृती पुरातत्व आणि भूगर्भशास्त्राच्या अभ्यासकांसाठी एक अमूल्य संधीच ठरते.

इ.स. पूर्व काळात हडप्पा संस्कृतीची भरभराट झाली, पुरातत्वीय शोधांवरून हडप्पा संस्कृतीचा हळूहळू विकास होत असल्याचे दिसून आले. हडप्पा संस्कृतीला इंग्रजीमध्ये “ Indus valley civilization” असं संबोधतात. संस्कृती प्रथम १९२१ मधे पाकिस्तान मधील पंजाब प्रांतात “ दयाराम साहनी” यांनी शोधली. या शोधात तांबे आणि मिश्रधातूंपासून बनवलेल्या अनेक वस्तू सापडल्या म्हणूनच हि संस्कृती कांस्ययुगीन म्हणून देखील ओळखली जाते. हडप्पा संस्कृतीमध्ये या संस्कृतीची नगररचना हे विशेष समजले जाते. पुरातन काळातील या हडप्पा नगराची रचना आणि स्थापत्य अत्यंत प्रगत होते. प्रचंड इमारती, स्नानगृहे, धान्याची कोठारे, नागरी वस्तीमधील घरे, भव्यदिव्य मंदिरे अगदी नियोजनबद्ध पद्धतीने बांधण्यात आलेली होती. सध्या खेडेगावात ज्याप्रकारे दगडांचा वापर करून घरे बांधतात तशी १०-२० घरे हडप्पा मध्ये ठराविक अंतरावर बांधलेली आढळली. रस्त्याच्या दुतर्फा अशी घरे बांधण्यात आली होती जी आजही भग्न झालेल्या अवस्थेत दिसतात. नगरच्या चहुबाजूला संरक्षक तटबंदी उभारलेली होती. नदीकाठी असलेल्या भागात हडप्पा संस्कृती असल्याने शेती हाच सर्वसामान्यांचा व्यवसाय होता. शेतीबरोबरच इतर शेतीविषयक जोडधंदे आणि दुग्धोत्पादन याची सुबत्ता होती. कुटुंबपद्धती आणि समाजरचनादेखील अतिशय सुसंस्कृतअसल्याचे पुरावे आढळलेले आहेत. एकूणच काय तर अतिशय आदर्श आणि प्रगत अशी हि संस्कृती म्हणूनच हडप्पा संस्कृतीचा उल्लेख होतो. पण असं जरी असलं तरी हि संस्कृती नामशेष कशी काय झाली असावी याचे पुरातत्व खात्यालासुद्धा मोठे कोडे पाडलेल आहे. इसवी सन पूर्व १९००-१३०० काळात हडप्पा संस्कृती नामशेष झाली. हडप्पा नामशेष होण्यामागे अनेक कारणे दिली जातात त्यापैकी परकीय आक्रमण आणि नैसर्गिक आपत्ती हि मुख्य कारणे होय. या दोन कारणांमुळे हडप्पा नगरवासी हे शहर सोडून दुसरीकडे स्थलांतरित झाले असावेत असा अंदाज व्यक्त केला जातो. असं असलं तरीदेखील हडप्पा संस्कृती नष्ट होण्यामागे कोणताही सबळ पुरावा देता येत नाही. नक्की कोणत्या कारणांमुळे नियोजनबद्ध आणि बिनचूक रचना असलेली हडप्पा नामशेष झाली हे अद्यापही गूढच आहे. परकीय आक्रमणात हडप्पा नगरातील घरे आणि लोकवस्त्या असलेली ठिकाणे नष्ट केली असं काही अभ्यासक सांगतात, खोदकामात अनेक मानवी सांगाडे सापडल्याने बहुतांश हडप्पावासी लोक हे परकीय सभ्यतेच्या आक्रमणात मारले गेले असावेत आणि जे काही वाचले असतील त्या लोकांनी इतर भागात स्थलांतर केले असा अभ्यासकांचा प्राथमिक अंदाज आहे.

हडप्पा नामशेषाची कारणे काहीही असोत, हडप्पा हि नेहमीच एक आदर्श नगररचना असलेल शहर म्हणून ओळखले जाईल. सध्या भग्न अवस्थेत जरी असले तरीही आधुनिक जगातील समाजरचना आणि नगररचना हडप्पा संस्कृतीमधून आदर्शवादाची प्रेरणा घेतच राहतील.

=================================================================

"द हार्टफुलनेस वे"

"द हार्टफुलनेस वे" या सुरेख पुस्तकाचा लाभ सगळ्यांनी करावा एवढं सुंदर पुस्तकं आहे ते, कमलेश डी. पटेल (दाजी) हे या पुस्तकाचे लेखक आध...